दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल कुटुंबांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त गोरगरीबांना मिठाई वाटप
शिरूर प्रतिनिधी
दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना गोरगरीबांची दिवाळी देखील गोड व्हावी यासाठी तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळ या कुटुंबांना मिठाई वाटप करण्याची परंपरा धारीवाल कुटुंबांनी आजही अबाधित सुरु ठेवली आहे.
शिरुर शहरातील अनेक गोरगरीब कुटुबांना दिवाळीनिमीत्त तोंड गोड करण्यासाठी मिठाई वाटपाची सुरुवात उद्योगपती (स्व) रसिकलाल धारीवाल यांनी शहरात सुरु केली होती. शहरातील शेकडो कुटुंबांना मिठाई वाटप करुन आपली दिवाळी साजरी करायची असा त्यामागचा उद्देश असून. तीच परंपरा आज त्यांचे सुपुत्र उद्योजक प्रकाशभाऊ धारीवाल व तिसरी पिढीतील युवा उद्योजक आदित्य धारीवाल यांनी सुरु ठेवली आहे.
शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,सचिव मनसुखलाल गुगळे,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण,राष्ट्रवादी (अजित पवार) शहराध्यक्ष शरद कालेवार, राष्ट्रवादी (शरद पवार ) शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे,सचिन धाडीवाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय देशमुख,पै अशोक पवार,प्रवीण दसगुडे, दादाभाऊ वाखारे,निलेश लटांबळे,आबीद शेख,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, तुकाराम खोले, अविनाश मल्लाव,प्रशांत शिंदे,जयवंत साळुंके, किरण बनकर,निलेश पवार, विनोद भालेराव,रंजन झांबरे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष एजाज बागवाण, आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे,कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार,उद्योजक राजेंद्र लोळगे,विनोद धाडीवाल,सागर नरवडे,आशिष शिंदे,किरण पठारे,सुनील बोरा,मयूर नहार,हाफिज बागवान, विशाल जोगदंड, डॉ. संतोष पोटे, संतोष थेऊरकर आदी धारीवाल कुटुंबीयांचे स्नेही यावेळी उपस्थित होते
शिरुर शहरातील सिद्धार्थनगर, सय्यदनगर, इंदिरानगर, बीसी हौंसिंग सोसायटी, शांतीनगर अशा परिसरात स्वत: जाऊन मिठाईच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले.
दिवाळीनिमित्त गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना देखील मिठाईचा आनंद मिळावा यासाठी अनेक वर्ष हा उपक्रम सुरु आहे. गोरगरीबांचे आशिर्वाद धारीवाल कुटुंबाच्या नेहमी पाठिशी असतात. त्यांच्या प्रेमाची कधी उतराई होऊ शकत नाही.
– प्रकाशभाऊ धारीवाल, उद्योजक



