शिरूर प्रतिनिधी
पुणे अहिल्यानगर महामार्गावर फलके मळा ता.शिरूर चौकात (कारेगाव) येथे टेम्पोची दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात आईचा मृत्यू तर दोन मुले जखमी झाले असून, अपघाता नंतर टेम्पोचालक फरार झाला आहे.
या अपघातात आरती गणेश सावंत (वय ३३, रा. गंगा फेज 3 जुडिओ मॉलचे पाठीमागे बाबुराव नगर शिरूर जवळ ) या अपघातात मरण पावल्या आहेत तर स्वराज गणेश सावंत(वय १५) व स्वराली गणेश सावंत( वय १२)हे दोघे जखमी झाले आहे.
याबाबत सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर (वय 28 वर्षे रा.उरळगाव ता शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक 4 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजण्याचे सुमारास स्वराज व स्वराली ही मुले शाळेला सुट्टया असल्याने मामा योगेश रणसिंग यांच्या गावी निमगाव म्हाळंगी (ता. शिरूर) येथे गेले होते. मात्र, आजपासून त्यांचे क्लासेस सुरू होत असल्याने आरती सावंत या अॅक्टिव्हा ही दूचाकी (क्र. एमएच १२ पीआर ६४५१) घेऊन त्यांना शिरूरला आणण्यासाठी सकाळीच निमगाव येथे गेल्या होत्या पुन्हा शिरूर कडे येत असतान कारेगाव, फलके मळा ता. शिरूर चौकामध्ये डिव्हायडर जवळ स्कुटी आली असताना अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो नंबर MH15 GV 7182 यावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालून एक्टिवा स्कुटी नंबर MH12 PR 6451 हिस पाठीमागून जोरात धडक दिली यात स्कुटी गाडीवरील आरती सावंत या मरण पावल्या तर त्यांची मुलगी स्वराली गणेश सावंत वय 12 वर्ष व मुलगा स्वराज गणेश सावंत वय 15 वर्षे यांचे किरकोळ व गंभीर
जखमी झाले आहे.
यामध्ये जखमी महिला आरती गणेश सावंत ह्या मृत झाले असून त्यांचे वय अंदाजे 30 ते 35 असून दोन्ही मुले स्वराज व स्वराली हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शिरूर येथे हलवण्यात आले असून अतिशय धोकादायक बनलेल्या फलके मळा येथील हायवे वरील फलके मळा चौक बाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी असून याच ठिकाणी अनेक नागरिकांना आपला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे या घटना त्वरित थांबवा व घटना झालेल्या चौकाची दुरुस्ती करून नागरिकांसाठी सुरक्षित करावा असे मागणी पुढे येत आहे.
याबाबत फिर्यादीवरून टेंपो चालक याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चव्हाण करीत
आहे.