जागतिक पर्यावरण दिनानिमित्त R3S सिक्युरिटी कंपनीकडून वाघोलीतील जोगेश्वरी टेकडीवर वृक्षारोपण; पर्यावरणाच्या संवर्धनाचा संकल्प
शिरूर प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त R3S सिक्युरिटी कंपनीने वाघोली येथील जोगेश्वरी टेकडीवर विशेष वृक्षारोपण मोहीम राबवित जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.
पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन सुधारण्यासाठी हा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे कंपनीने म्हटले आहे. निसर्गाचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण करण्याची गरज या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आली.
यावेळी R3S सिक्युरिटी कंपनीचे संचालक रवींद्र आढाव यांच् होम्स फाऊंडेशनचे दत्तात्रय खालीपे, ब्रिलियंट संचालक संदीप साकोरे, पोलिस पाटील तुषार पाचुंदकर, अजित वाघमारे, सुखदेव पाखरे आणि संपूर्ण R3S ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी R3S सिक्युरिटी कंपनीचे संचालक रवींद्र आढाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये दत्तात्रय खालीपे (होप्स फाउंडेशन), संदीप साकोरे (ब्रिलियंट HR संचालक), तुषार पाचुंदकर (पोलीस पाटील, रांजणगाव गणपती) आणि अजित वाघमारे (mytrademarkwale.com) यांचा समावेश होता. तसेच, श्री. सुखदेव पाखरे आणि संपूर्ण R3S ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना. R3S सिक्युरिटी कंपनीचे संचालक रविंद आढाव यांनी सांगितले की, आज लावलेल्या प्रत्येक वृक्षाची संपूर्ण जबाबदारी ते स्वतः घेतील आणि त्यांची योग्य काळजी घेतील. भविष्यातही कंपनी आणि HR ग्रुपच्या माध्यमातून असेच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातील असे त्यांनी आश्वासन दिले. पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी रायगड येथे स्वच्छता मोहीम राबवून एका महत्त्वाच्या प्रकल्पाला सुरुवात करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
R3S सिक्युरिटी कंपनीच्या या उपक्रमामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इतरांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.