शिरुर, प्रतिनिधी
विविध प्रश्नानसाठी सामाजीक कार्यकर्ते निलेश वाळुंज हे दिनांक २ पासुन तहसील कार्यालयात बेमुदत सत्याग्रह आंदोलनाला बसले होते सत्याग्रह आंदोलनाला बारा दिवस व उपोषणाला पाच दिवसा नंतर प्रादेशिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या शी विविध विषयांनवर चर्चा केल्या नंतर बहुतांशी मागण्या मान्य झाल्याने व तसे लेखी पत्र चव्हाण यांनी दिल्या नंतर निलेश वाळुंज यांनी आपले उपोषण सोडले
या वेळी प्रादेशिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते सरबत देउन उपोषण सोडण्यात आले . या वेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई,सहायक अभियंता अनिल जाधव,उपविभागीय अधिकारी सूर्यकांत कुंभार ,विठ्ठल पवार, गणेश जामदार,डॉ.संतोष शिंदे,माऊली पवार,माजी सरपंच दत्तात्रय कुरुंदळे, माजी उपसरपंच लक्ष्मण कुरुंदळे, विशाल शिंदे बजरंग दल,महेश कुरुंदळे,किरण कुरंदळे.मोहन पवार,भाऊ रासकर,दादाभाऊ कुरुंदळे,शरद कुरंदळे सचिन रासकर,प्रताप दसगुडे,सोमनाथ भगत, मंदा वाळूंज,सुनीता वाखारे,कल्पना पुंडे,सीमा गिरमकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
या वेळी
रा.मा.१०३, मार्गावरील “आमदाबाद ते मलठन रस्ता व कोंढाण ओढा पुलावरील , निकृष्ठ आणि अशास्त्रीय कामांच्या चौकशी व्हावी
उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून राज्य मार्ग-१०३ (आमदाबाद ते मलठण) या रस्त्याच्या निकृष्ट कामांची सखोल व निपक्ष चौकशी करावी,
सदर रस्त्याची दक्षता गुण नियंत्रण मंडळामार्फत तत्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी.
व तपासणी/चौकशी अहवाल सार्वजनिकपणे प्रसिद्ध करून, रस्त्याचे काम नव्याने दर्जेदार पद्धतीने सुरु करावे.
गोपनीयतेचा आडोसा न घेता, पूर्वी रामलिंग ते अन्नापूर रस्त्यावर झालेल्या निकृष्ट कामाचा दक्षता गुणनियंत्रण अहवाल जनतेसमोर सादर करावा.
वरील दोन्ही निकृष्ठ कामांबाबत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर २०१७ च्या शासन निर्णयानुसार गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या विषयावर चर्चा होउन त्यातील काही मागण्या मान्य करत चव्हाण यांनी तसे लेखी दिले .
फोटो वाळुंज यांना पत्र व सरबत पाजताना बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण