मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्यात वीस पट मराठ्यांनी सहभागी होण्याचे मराठा आरक्षण जनक मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
शिरूर दिनांक प्रतिनिधी
मराठा आरक्षणात आजपर्यंत चार कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे उरलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा बांधव जाणार आहेत त्यासाठी या आंदोलनात मदत करणारे परंतु सहभागी न होणारे डॉक्टर वकील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यांनी मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी दोन दिवस द्यावेत आरक्षण आणण्याची जबाबदारी माझी असल्याचा विश्वास मराठा आरक्षण जनक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला तर जाती-जातीत भांडणे लावण्यासाठी छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद दिल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
शिरूर येथे क्रिटीकेअर हॉस्पिटल च्या उद्घाटन मराठा आरक्षणाचे जनक मनोज जारंगे पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
शिरुर क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उदघाटन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हस्ते झाले .यावेळी माजी नगरसेवक विठ्ठल पवार , आखिल भारतीय मराठा महासंघाचे संभाजीराव कर्डिले , श्यामकांत वर्पे , शोभना पाचंगे ,युवराज थोरात, नवनाथ फरगडे ,माजी सरपंच प्रकाश थोरात , तुषार दसगुडे , रुपेश घाडगे , रमेश दसगुडे आदी उपस्थित होते .डॉ . निखील अनभुले , डॉ .कृतिका अनभुले डॉ .अंकुर फलके , डॉ . आदर्श पांडेय , डॉ शुभम भुतकर व डॉ पूजा भूतकर उपस्थित होते.
२९ ऑगस्ट रोजी आरक्षणाची अंतिम लढाई करीता जाणार आहोत. त्यासाठी प्रत्येक घरातील मराठा बांधवांनी घराच्या बाहेर पडा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी करून डॉक्टर वकील शिक्षक सरकारी निमसरकारी कर्मचारी हे मदत करतात परंतु आंदोलनात सहभागी होत नाही त्यांनी यावेळी तुमचे दोन दिवस आरक्षणासाठी द्या उरलेल्या सगळ्यांना आरक्षण कसे मिळत नाही हे मी पाहतो असा विश्वास देत यावेळी मागच्या मुंबई आंदोलनात जेवढी गर्दी झाली त्यापेक्षा वीस पट गर्दी झालीच पाहिजे असेही जरांगे पाटील यांनी सांगून, राज्यावर असे कोणते संकट पडले नव्हते की छगन भुजबळ यांना मंत्री पद दिलेच पाहिजे हा केवळ जातीय दंगली व मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा व मराठा ओबीसी वाद लावायचा यांचे प्रशिक्षण ही दिले आहे असा आरोप नाव नघेता मुख्यमंत्री यांच्यावर करून मराठ्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करायचे मराठ्यांची शांतता भंग करायची हाच यांचा उद्देश असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी करून, हाकेला मी विरोधक मानतच नाही असे सांगून गावागावात मराठा धनगर यांचे संबंध चांगले आहेत त्याचे आरक्षण वेगळे आहे असेही जरांगे पाटील यांनी सांगितले .
नवीन हॉस्पिटल सुरू करणारे डॉक्टर तुम्ही बुद्धिजीवी वर्गाने समाजातील लोक आपल्या गावातील व्यक्ती डॉक्टर झाला तर त्याने सहकार्य करावे अशी माफक अपेक्षा असते ती गोरगरीब नागरिकांची अपेक्षा सहकार्य करून पूर्ण करावी त्यातून गोरगरिबांचे आशीर्वाद भेटतील तुमच्या सहकाऱ्याने व उपचाराने त्यांचे आजार बरे होतील आणि त्याचा ओढा आपल्याकडे वाढेल व तुम्हाला त्याचा फायदा होईल असा सल्ला डॉक्टरांना मनोज जरांगे पाटील यांनी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक डॉ . पूजा भूतकर यांनी केले .सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी तर आभार डॉ अंकुर फलके यांनी मानले .