शिरूर प्रतिनिधी
रांजणगाव गणपती ता. शिरूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मृत महिला व दोन मुलांची अद्याप ओळख न पटल्याने शवविच्छेदनानंतर हे मृतदेह तज्ज्ञांच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली असून या गुन्ह्याचा तपासाठी पोलिस पथके अहोरात्र प्रयत्न करीत आहे..
या गुन्ह्याच्या तपासासाठी सहा विशेष पथके तपासा करीत आहे.
रांजणगाव गणपती ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागे झुडपात २५ ते तीस वयोगटातील महिला आणि दीड व चार वर्षांची मुले यांचा डोक्यात मारहाण करून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पण झाले आहे.
काल शिरूर येथील शवविच्छेदन गृहात तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर एक्स्पर्ट ओपिनियन साठी ते ससून ला हलविण्यात आले. तेथे तपासणी करून मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत.
शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस, शिरूर पोलिस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तीनही पोलिस स्टेशनचे पथके या गंभीर खून प्रकरणाच्या तपास करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकही समांतर तपास करीत आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिरूरचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सहा पथके विविध मार्गांनी तपास करीत आहेत.
यात मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून पुणे जिल्ह्यासह राज्यात कुठे महिलेसह दोन लहान मुले बेपत्ता झाली आहेत का, याबाबतची माहिती घेतली जात आहे.
पुणे अहिल्यानगर महामार्गावर घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फूटेज, परिसरातील खोली मालकांकडून भाडेकरूंची माहिती घेतली जात आहे. या प्रकरणात प्रथमच मानवी तस्करी विरोधी सेलची मदत घेतली जात असल्याची माहिती तपास अधिकारी महादेव वाघमोडे यांनी
दिली.