शिरूरमधील दोन मिसिंग अल्पवयीन मुलींचा शोध घेत पालकांच्या ताब्यात सुपूर्त - संदेश केंजळे पोलिस निरीक्षक.
शिरूर (प्रतिनिधी)
किरकोळ कारणावरून पालकांशी झालेल्या वादानंतर घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या पालकांच्या ताब्यात सुपूर्त करण्यात शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे तपास पथकाला यश आले आहे.
दिनांक १६ मे व १७ मे २०२५ रोजी शिरूर शहरातील दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील अल्पवयीन मुली कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याच्या तक्रारी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. याबाबत मिसिंग दाखल करण्यात आले.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला.
परंतु अल्पवयीन मुली मिसिंग बाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे गंभीर दखल घेत शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाला या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या.त्या सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. मुलींकडे कोणताही मोबाईल नसल्याने आणि त्यांना कोणी नेले असावे याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीदारांचे आधारे दोन्ही मुलींचा तपास लागला. दिनांक १८ मे २०२५ रोजी दोन्ही मुलींचा शोध लागून त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले. चौकशीत दोन्ही मुलींनी पालकांशी झालेल्या किरकोळ वादामुळे रागाच्या भरात घर सोडल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार दीपक राऊत, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, सचिन भोई, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, अशोक चितारे, महिला पोलीस अंमलदार गोदावरी धंदरे व कल्याणी कोडवते या पथकाने केली आहे.