शिरूर तालुका मांडवगण फराटा, तरडोबावाडी येथे फ्लॉवर व कलिंगड बरोबर शेती मालाचे नुकसान

9 Star News
0

 


शिरूर प्रतिनिधी 

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. विशेषतः कलिंगड व फ्लॉवर (फुलकोबी) या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.


पावसामुळे शेतातील उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून, शेतकरी पांडुरंग रामभाऊ चाकोर यांचे संपूर्ण उत्पादन पाण्यात गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पीक काढणीस तयार होते, बाजारात नेण्यासाठी तयारी सुरू होती, पण पावसामुळे सगळेच पाणीफार झाले. महिन्याभराचा कष्टाचा घास हिरावून गेला आहे.”


या घटनेमुळे चाकोर यांच्यासह परिसरातील इतर शेतकरीही अत्यंत चिंतेत असून प्रशासनाकडून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. चाकोर यांनी थेट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली असून, शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या संकटाचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने मदतीचे पाऊल उचलावे, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.तर मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचले आहे.

शिरूर तरडोबावाडी येथील शेतकरी माणिक गावडे शेतात पाणी पिकाचे नुकसान 

     


शिरूर शहर व पंचक्रोशी गेल्या आठ दिवसापासून पावसाने हजेरी लावली असंन मुसळधार व दोराच्या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी या पावसाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील कोबी, फ्लॉवर ,कांदा, कोथिंबीर, टोमॅटो या नगदी पिकांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे तर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला असून, या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही शेतकरी वर्गातून होत आहे.

माणिक गावडे यांच्या शेतात पाणी साचले असून फ्लॉवर पिकाचे मोठे नुकसान झाले फोटो 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!