धनंजय देशमुख प्रकरणात सरकारचा छुपा अजेंडा.. मित्राला वाचवण्याचे काम केले नाव नघेता धनंजय मुंडेवर टीका -मनोज जरांगे पाटील

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने छुपा अजिंठा वापरून मित्राला अलगद बाजूला घेतले आहे. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी करून राज्य शासनावर व धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका करून अन्यथा आरोपींची संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
     मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील पुण्याहून अहिल्यानगर त्या दिशेने जात असताना शिरूर येथील हॉटेल अंबिका येथे धावती भेट देऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
        यावेळी रमेश दसगुडे,संपत दसगुडे, बाबुराव पाचंगे, अविनाश घोगरे, संदिप गायकवाड,
शिवसेनेचे जिल्हा सल्लागार कैलास भोसले, रुपेश घाडगे, अविनाश जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर नरवडे, शैलेश जाधव  कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
         आरक्षणा संदर्भातील काही मागण्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्याची मुदत मागवून घेतली असून काही मागण्या संदर्भात येत्या अधिवेशनात निर्णयाचे आश्वासन देण्यात आले आहे .
एका जातीवर निवडणुक लढता येत नाही . विधानसभा निवडणूकीत दलित मराठा मुस्लिम समीकरण जुळले नाही अशी खंत ही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
      गुंडांची मोठी टोळी कार्यरत असून, ही टोळी माणसे मारण्याचे काम करत आहेत या गुंडाच्या विरोधात बोलणे , गोरगरिब मराठाना आरक्षण मागणे जातीयवाद आहे का? असा सवाल ही जरांगे यांनी उपस्थित केला .धनंजय मुंडेच्या टोळीने शेतकरी गोरगरीबांना त्रास दिला अन्याय केला तर राहिलेल्या टोळीस जेल मध्ये घालण्याकडे मोर्चा वळवावा लागेल असे ही जरांगे
म्हणाले .

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!