शिरूर चे उद्योगपती दानशूर स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात १२४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून उच्चांक गाठला आहे.
यंदा रक्तदान शिबिराचे हे सातवे वर्ष आहे तर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ शिरूर व पंचक्रोशी व पुणे येथील केइम ब्लड बँक, शिरूर येथील ओम ब्लड बँक, अहिल्यानगर येथील आनंद ऋषी ब्लड बँक, अहिल्यानगर अर्पण ब्लड बँक, भोसरी पुणे येथील संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे महारक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
दानशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या 86 व्या जयंती निमीत्त आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे माजी आमदार अशोक पवार व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारिवाल, नाते रक्ताचे राम बांगर, माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व स्वर्गीय रसिकलाल धारीवाल यांच्या प्रतिमेत पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी मनसेचे नेते बाबू वागस्कर, राम बांगर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माजी नगरसेवक विजय दुगड, माजी नगराध्यक्ष जाकिरखान पठाण, गोडाजी पार्श्वनाथ ट्रस्ट विश्वस्त सतिश धाडीवाल,रमेश कर्नावट, घोडगंगा च माजी संचालक पांडुरंग थोरात, जुन्नर चे तहसीलदार सुनील शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे,रक्तदान शिबराचे आयोजक प्रशांत शिंदे,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, तुकाराम खोले, संघपती भरत चोरडिया, शरद कालेवार, योगेश जामदार,संजय देशमुख,विनोद भालेराव,, किरण बनकर,संतोष शितोळे,सागर नरवडे,निलेश जाधव, सुशांत कुटे, संजय देशमुख, अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, राजेंद्र गावडे, आशिष नहार,एजाज बागवान,मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, उद्योजक धरमचंद फुलफगर, शिवसेवा मंडळाचे सचिव मनसुख गुगळे,माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, आदर्श सरपंच अरुणराव घावटे, श्रीनिवास परदेशी, प्रभाकर ढेरे , ॲड विलास करंजुले, आर एम डी धारीवाल स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु, रंजन झांबरे,सरपंच विठ्ठल घावटे,अविनाश जाधव, सुनिल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते स्वप्निल गायकवाड, महेश ढमढेरे आजी-माजी नगरसेवक प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांनी अपार कष्टातून शुन्यात विश्व निर्माण केलेले आपण पाहीले आहे.समाजातील गोर गरीब लोकांना नेहमी मदतीचा हात दिला त्यामुळे रसिकभाऊ यांच्यावर प्रेम करणारी जनता पाहुन विक्रमी रक्तदान होईल व रक्तदान श्रेष्ठ दान असून अशा सामाजिक उपक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळत असतो असे मत शिरुर हवेलीचे माजी आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले .
यावेळी बोलताना मनसे नेते बाबु वागस्कर म्हणाले शिरुर शहराला खऱ्या अर्थाने नावारुपाला आणल धारीवाल कुटुंबियांनी आणल आहे. रसिकभाऊ धारीवाल यांच्या बरोबर काम करायला भेटले हे माझे भाग्य समजतो अन् आता भाऊ नंतर प्रकाशभाउ व आदित्य बरोबर सुध्दा काम करण्याची संधी मिळत असुन,सात ते आठे वर्ष हे शिबीर आयोजीत केले जात असुन या शिबिराला मी हजर असतो असे वागस्कर म्हणाले .