रांजणगाव सांडस ता.शिरूर रणपिसे वस्ती येथे वन विभागाने राजेंद्र रणपिसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे त्यामुळे शिरूर तालुक्यातील जवळच असणाऱ्या या गावांमध्ये सलग दोन दिवसात दोन बिबटे जेरबंद झाल्याने बिबट्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी रणपिसे वस्ती रांजणगाव येथे बिबटया दिसल्याने वनाधिकारी यांनी पिंजरा लावला होता. रात्री त्यामध्ये पाच ते सहा वर्षाचा बिबट्या अडकला आहे. या बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांनी आयोजित घातला असून पूर्व भागात बिबट्याने दोन चिमुकल्यांचा बळी घेतल्यानंतर वन विभाग शतक झाले आहे वन विभागांनी मोठ्या प्रमाणात पिंजऱ्या आणून या भागात बिबट्या पकडण्यासाठी लावली आहे. गेले काही दिवसांपासून बिबट्या पिंजऱ्ना हुलकावनी देत होता परंतु काल आणि आज दोन व त्याअगोदर एक असे तीन बिबटे जेर बंद झाले आहे. काही दिवसापूर्वी रांजणगाव सांडस येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभागाने तात्काळ रणपिसे वस्ती येथील राजेंद्र रणपिसे
यांच्या शेतात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता त्यात रात्री बिबट्या जेरबंद झाला आहे. या भागात बिबट्या जेरबंद होत असल्याने नागरिकांमधून शाळकरी मुले महिला शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करत असून वन विभागाच्या या यशाचे स्वागत करण्यात येत आहे.
जुन्नर विभागाचे उप वन संरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वन उप संरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष कंक,वनपाल गौरी हिंगणे वनरक्षक विशाल चव्हाण शेखर जान गवळी,वनसेवक रेस्क्यू टीम सुधीर शितोळे शरीफ शेख संदीप गव्हाणे राहुल अवचिते रोहिदास शेंडगे यांनी बिबट्याला जेरबंद करण्याचे कार्य केले.