शिरूर शहरातील डंबेनाला येथे 90 च्या दशकामध्ये शहराला वडापावची भुरळ घालणाऱ्या छोटूभाई सौदागर यांच्या निधनाने शिरूरकर भावुक झाले होते.
शिरूर शहरातील डंबेनाल येथे एका कोपऱ्याला छोटूभाई यांनी वडापाव ची गाडी चालू केली होती. या काळात मनमिळाऊ व हसतमुख असणारे छोटूभाई शिरूर शहरातील नागरिकांच्या पसंतीत उतरले होते. त्यांच्या वडापावची चव व लज्जत सगळ्यांच्या मनावर राज्य करून गेली.
गोरगरीब असो वा श्रीमंत असो शाळकरी मुले असो महिला असो शाळकरी मुली असो सर्वांशी हसतमुखाने व बहारदार आवाजाने छोटूभाई यांनी सर्वांची मने जिंकली होती.
बोलण्यात मन तर जिंकलीत पण वडापावच्या चविने व लज्जतीने शिरूरकर छोटूभाईंचे चाहते झाले होते. शिरूर श्रीगोंदा पारनेर या तीनही तालुक्यात यांचे वडापावचे दिवाणे होते.
तसे पाहिले गेले तर शिरूर शहरातील सर्वात मोठे कुटुंब असणारे सौदागर कुटुंब हे शिरूर शहरातील नागरिकांपुढे एक आदर्श एकत्र कुटुंब होते. त्यांचे नॉनव्हेज बनवण्यात हातखंडा नव्हता. परंतु छोटूभाई यांनी नॉनव्हेजला रामराम ठोकून मित्रांच्या साह्याने व्हेज वडापाव सुरू केला. हा वडापाव घेण्यासाठी लोकांच्या रांगा डंबेनाला येथे पाहिला मिळायच्या.
आजही त्या ठिकाणी त्यांची वडापावची गाडी सुरू आहे. त्यांचे धाकटे चिरंजीव ही गाडी आजही चालवतात. परंतु काल अचानक छोटूभाई यांचं दुर्दैवी निधन झालं ही वार्ता शिरूर शहराला कळताच ज्यांनी ज्यांनी छोटूभाई यांचा वडापावची चव चाखली ते आज लहानपणीचे मध्यमवर्गीय झालेले तरुण महिला व्यापारी उद्योजक यांनी आपण कसे छोटूभाईच्या येथे जाऊन वडापाव खायचो
.... कशी मजा यायची ..... छोटू भाईंच्या बोलण्याची लबक... आणि त्या कळी असणारा दोन रुपयाचा वडापाव
खाण्यासाठी गोळा केलेले पैसे ..... या सर्वच गोष्टींना काल उजाळा मिळाला... आणि शिरूर शहराr छोटूभाईंच्या वडापावचे नाव कायम राहील हे मात्र नक्की
शिरूर शहरातील डंबेनाला येथिल छोटूभाई फकीर मोहम्मद शेख(सौदागर) (वय ८५) हे बिडी पित असताना बिडी कपड्यांवर पडल्याने आग लागली आणि होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांना पॅरालिसिसचा आजार होता.
घरामध्येच बीडी पित असताना ही घटना घडली आहे.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे त्यांचा मुलगा हमीद छोटू शेख (वय 48) यांनी आकस्मित निधनाची खबर दिली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटूभाई हे बुधवारी (ता. ४) दुपारी बिडी पित होते. यावेळी त्यांच्या लुंगीला आग लागली. यावेळी घरातील नातेवाईकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ते गंभीर भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा राउत हे करत आहे. पोलिसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.