टाकळी भिमातील शेतकऱ्याचे ५० गुंठ्यात भरघोसउत्पन्नवीस किलो धन्यातून आठ लाख एक्कावन हजारांचा नफा

9 Star News
0
टाकळी भिमातील शेतकऱ्याचे ५० गुंठ्यात भरघोसउत्पन्नवीस किलो धन्यातून आठ लाख एक्कावन हजारांचा नफा
शिरूर 
( प्रतिनिधी ) टाकळी भीमा ता.शिरुर येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ करपे यांनी त्यांच्या पन्नास गुंठे शेतातपिकवलेल्या वीस किलो धना मधून पंधरा हजार कोथंबीर घेत तब्बल आठ लाख एक्कावन हजारांचेउत्पन्न मिळवले आहे.                           टाकळी भीमा ता. शिरुरयेथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ करपे यांनी त्यांच्या पन्नास गुंठे शेतात जुलैमहिन्याच्या अखेरीस कोथंबीर ची पेरणी केली, त्यांनतर बाळासाहेब यांची चार मुले देविदासकरपे, मोहन करपे, किरण करपे, विशाल करपे यांनी शेतामध्ये विशेष लक्ष केंद्रित करत स्प्रीन्करच्यामाध्यमातून वेळेवर पाणी देऊ करत कोथंबीरचे चांगले पिक फुलवले, करपे यांना सदर पिकासाठीएकूण चाळीस हजार रुपयांचा खर्च झेलला असताना सध्या कोथांबीरला चांगला बाजार भाव असतानानुकतेच मंचर येथील श्री सद्गुरू व्हेजिटेबल कंपनीचे संचालक आदेश पोखरकर, गणेशशिंदे, सोमनाथ काटकर, पप्पू शेवाळे यांनी करपे यांच्या शेताला भेट देत त्यांच्याशेतातील सर्व कोथांबीरचा जागेवर व्यवहार करत सर्व पन्नास गुंठे मध्ये असलेली कोथांबीरचक्क आठ लाख एक्कावन हजार रुपयांना घेतली, यावेळी करपे बंधूंनी शेतातच जल्लोष करत गुलालउधळून श्री सद्गुरू व्हेजिटेबल कंपनीच्या संचालकांचा सन्मान केला, शिरुर तालुक्यातीलशेतकऱ्याच्या या अनोख्या उत्पन्नाची चर्चा चक्क पुणे जिल्ह्यात रंगत असताना याबाबतसोशल मिडीयामध्ये माहिती प्रसारित होताच परिसरातील अनेक शेतकरी करपे यांच्या शेतातकोथांबीर पाहण्यासाठी गर्दी करु लागले आहे.स्वतंत्र चौकट १ –शेतामध्ये कोणतेही पिक घेतानायोग्य नियोजन करुन योग्य मार्गदर्शनाखाली शेती केल्यास नक्कीच चांगले उत्पन्न मिळतअसल्याचे  शेतकरी देविदास करपे व किरण करपेयांनी सांगितले.फोटो खालील ओळ – टाकळी भिमातील शेतकऱ्यांच्याकोथांबीरचे आठ लाख एक्कावन हजार रुपयांना व्यवहार होताच जल्लोष करत खरेदीदारांचा सन्मानकरताना करपे बंधू.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!