शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून शिरूर शहरातील निलेश खाबिया 68 वेळा,अनिल बांडे 62 वेळा,वैशाली खाबिया 15 वेळा, मीत खाबिया 10 वेळा, रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने १४ जुन जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्याचा जीव वाचवू शकते.जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत असल्याचे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या राणी कर्डिले यांनी सांगितले.
१४ जुन हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो . जे लोक स्वैच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही, हे सांगणेही आवश्यक आहे.सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते.
सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना व धकाधकीच्या बर्याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात, ऑपरेशनच्या वेळी, रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे आणि तो आपण करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प करावा.संस्थेचा अध्यक्षा राणी कर्डिले यांनी ही 13 वेळा रक्तदान केले आहे,यापुढेही नेहमी करत रहाणार ,असे सांगितले.
यावेळी शिरूर शहरातील सर्वात जास्त वेळा ज्यांनी रक्तदान केले ,त्यांचा रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीफळ ,गुलाब पुष्प,शाल देऊन सन्मानित करण्यात आले,यामध्ये
निलेश खाबिया 68 वेळा,वैशाली खाबिया 15 वेळा, मीत खाबिया 10 वेळा,अनिल बांडे 62 वेळा रक्तदान केलेलं असुन आम्हा सर्वांना रक्तदानाचे शतक करावयाचे असल्याचा संकल्प त्यांनी केला.
यावेळी डॉ.स्मिता कवाद,गीता आढाव, अनुपमा दोषी,शीतल शर्मा उपस्थित होते.
सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी मानले.