शिरूरमध्ये बेमुदत सत्याग्रह आंदोलन पाच दिवसापासून सुरू
आमदाबाद–मलठन रस्ता व कोंढाण ओढा पूल प्रकरणी जनतेचा एल्गार
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते मलठन रस्ता आणि कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ट, अपूर्ण कामाच्या निषेधार्थ सामजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांचे बेमुदत सत्याग्रह आंदोलन पाचव्या दिवशी सुरूच...
शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा ठेकेदारालाच पाठीशी घालण्याचे काम सुरू असून, तालुक्यात अनेक निकृष्ट आणि चुकीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरद असताना सुरू आहे सर्वात मोठा भ्रष्टाचार या खात्यात आहे परंतु शासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
हे आंदोलन निलेश वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली होत असून, तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संबंधित रस्त्यावरील कामांची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, तसेच आधी झालेल्या अपूर्ण व निकृष्ट कामांचे अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणी होय.
दरम्यान, आंदोलकांनी असा आरोप केला आहे की काल, आंदोलनाच्या आदल्यादिवशी, संबंधित विभागाने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ऐन पावसाळ्यात रस्त्याचे काम तातडीने सुरू केले. ही धूळफेक असून ती अधिक तपासली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“जनतेचा पैसा वाया घालवू नका – जबाबदारांना शिक्षा झालीच पाहिजे,” या घोषवाक्याखाली सुरू झालेल्या या आंदोलनाने तालुक्यात जनतेच्या हितासाठी नवा लढा उभारला
आहे.