शिरूर प्रतिनिधी
रांजणगाव गणपती येथील तेरी हत्याकांडातील मृत महिलेची व तिच्या दोन मुलांची ओळख पटली असून बहिणीच्या दिराने प्रेम संबंधातून लग्नाची मागणी करत असल्याने महिलेला व तिच्या दोन मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून आरोपींनी हे तिहेरी हत्याकांड घडून आणले असल्याची कबुली पोलीस तपासात दिली असून आरोपीला पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.
कुठलाही धागा दोरा नसताना पंधरा दिवस रात्र दिवस तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या असून, किचकट आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक संदीप गिल व पोलिस पथकाने लावल्याने पोलिसांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जातीने लक्ष घातले होते तर या गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पोलीस पथके तयार करण्यात आली होती अखेर कुठलाही धागा दोरा व सुगावा नसतानाही या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.
तर या तेहरी हत्याकांडामुळे शिरूर तालुका पुणे जिल्हा व राज्यात खळबळ उडाली होती. या तिहेरी हत्याकांडाच्या तपास करणे करणे पोलिसांपुढे व नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या यांच्यापुढे मोठे आव्हान होते अखेर हे आव्हान पोलिसांनी पार करून आरोपीला जेरबंद केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप गिल व पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.
तिहेरी हत्याकांडाचा मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय २५,)स्वराज (वय २ वर्षे), विराज ,(वय १ वर्षे रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत महिलेचे व तिच्या दोन मुलाची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत.
गोरख पोपट बोखारे (वय ३६, सध्या रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता अकरा जून पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
दिनांक २५ मे २०२५ रोजी रांजणगाव गणपती गावचे हद्दीत पुणे-नगर हायवे लगत, बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे रोडचे बाजूला काही अंतरावर एक महिला, दोन लहान मुले असे एकूण तीन मृतदेह आढळून आले होते. सदरचे मृतदेह हे मृत अवस्थेत व अर्थ जळालेले होते. याबाबत अंमलदार सहायक फौजदार गुलाबराव भिमराव येळे यांनी फिर्याद दिली होती.
मृत महिलेच्या हातावरील "जयभिम, Rajratan, mom dad, RS" या गोंदणाच्या (टॅटू) आधारे ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे-नगर हायवेवरील सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेले, १६ हजार ५०० भाडेकरूंची चौकशी करण्यात आली आणि एमआयडीसी क्षेत्रातील कामगारांकडेही तपास केला गेला. आरोग्य विभागाच्या आशा वर्कर्सच्या मदतीने लसीकरणाची माहिती मिळवून लहान मुलांची ओळख पटवण्याचाही प्रयत्न झाला, परंतु यश मिळाले नाही. घटनास्थळी झालेल्या पावसामुळे कोणतेही ठसे उपलब्ध नव्हते आणि सीसीटीव्ही कॅमेरेही दूर दूर नव्हते, ज्यामुळे तपासाची गुंतागुंत वाढली होती. तर मृत महिलेचे चित्र रेखाटून तीचा तपास सुरू केला होता परंतु ओळख पटत नव्हती. पोलिस पाटील यांची मदत घेऊन उपयोग झाला नाही अखेर
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने बैठक घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि शिरूर उपविभागातील पोलीस स्टेशनच्या तपास पथकांना मार्गदर्शन केले. त्यांनी एक अनोखी युक्ती वापरली: पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनमधून प्रत्येकी एक अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार यांची पोलीस मुख्यालयात बैठक घेतली. त्यांनी स्वतः सर्व अंमलदारांना सूचना देऊन, शिरूर उपविभागाचे एसडीपीओ प्रशांत ढोले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण २८ अंमलदारांची ६ तपास पथके तयार केली. ही पथके महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात मानव मिसिंगची माहिती घेऊन पडताळणी करण्यासाठी रवाना करण्यात आली.या पथकांपैकी बीड जिल्हयात गेलेल्या पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ९ मे २०२५ रोजी दाखल झालेल्या एका महिलेच्या मिसिंगची नोंद आढळून आली. ही महिला मृत महिलेच्या वर्णनाची असल्याने अधिक तपास केला असता, ती मृत महिलाच असल्याची खात्री झाली. मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) असे निष्पन्न झाले.
स्वातीचा पती केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता, स्वाती तिच्या दोन मुलांसह (स्वराज वय २ वर्षे, विराज वय १ वर्षे) आळंदी येथे तिच्या आई-वडिलांकडे गेली होती. पती-पत्नीमध्ये भांडणे होत असल्याने स्वाती तिच्या बहिणीचा दीर गोरख पोपट बोखारे (वय ३६, सध्या रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्यासोबत २३ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता आळंदीहून दुचाकीवरून गेली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली.
पोलिसांनी आरोपी गोरख बोखारे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता आरोपी हा मृत स्वाती सोनवणे बहिणीचा दीर असून, स्वाती ही आरोपीच्या चुलत मामाची मुलगी असल्याने ते एकमेकांचे नातेवाईक होते.
स्वाती आणि तिच्या पतीमध्ये नेहमी भांडणे होत असत, त्यामुळे गोरख बोखारे त्यांच्यातील वाद मिटवत असे. याच दरम्यान, गोरख बोखारे आणि स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून स्वाती गोरखकडे नेहमी लग्नाची मागणी करत होती, ज्यामुळे गोरख त्रस्त होता. स्वाती ही आळंदी येथे आईवडिलांकडे होती तेथून २३ मे २०२५ रोजी आरोपी गोरख याने त्याच्या दुचाकीवर मृत स्वाती सोनवणे आणि तिची दोन्ही मुले यांना आळंदी येथून घेतले. सरदवाडी, शिरूरकडे जात असताना रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील पुणे-नगर हायवेरोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर त्याने दुचाकी थांबवली. सतत लग्नाची मागणी करणारी स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहांवर पेट्रोल टाकून जाळले असल्याचे पोलिस चौकशीत सांगून त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपी गोरख पोपट बोखारे याला रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला ११ जून २०२५ पर्यंत शिरूर न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, दौंड विभागाचे उपविभागीय अधिकारी बापुराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, AHTU पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, स्थागुशा पोलिस उपनिरीक्षक. दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलिस उप निरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, शिक्रापूर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे , स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, वाळासाहेब खडके, रामदास वावर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पोलिस स्टेशन विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ, यांनी केली आहे.
.