शिरुर, प्रतिनिधी
शिरूर व हवेली तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने फळबागांसाठी पथदर्शक प्रकल्पातुन पाचशे कोटीची तरतूद करण्यात आली असून या माध्यमातून निर्यातक्षम फळे तयार करून त्यातून शेतकरी सक्षम झाला पाहिजे हा शासनाचा उद्देश असल्याचे शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करून अधिकारी वर्गांनी खरीप हंगाम चांगला व्हावा यासाठी शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचनाही कटके यांनी यावेळी दिल्या.
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरूर व हवेली महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय खरीप हंगाम 2025 26 नियोजन व आढावा बैठक शिरूर तहसील कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आली होती या आढावा बैठकीचे अध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके होते.
यावेळी शिरूर तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक (कटके), हवेली तालुका कृषी अधिकारी एम डी साळी, शिरूर पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश डोके,हवेली गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, नायब तहसीलदार सुजाता खरमाटे, शिरूर पंचायत समिती कृषी अधिकारी दिनेश अडसूळ, हवेली पंचायत समिती कृषी अधिकारी डॉ गजानन नारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुका प्रमुख अनिल पवार, रामभाऊ कदम,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद कालेवार , सुनिल जाधव, स्वप्निल रेड्डी, माजी सरपंच संतोष लंघे,शामराव पवार, पीडीसीसी बँक अधिकारी, महावितरण कंपनीचे अधिकारी, सह कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील, संपत कंठाळे, धनश्री चासकर ,शिवाजी पाटील सह तालुक्यातील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी सह शेतकरी उपस्थित होते
स्थानिक शेतकरी आणि प्रशासनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या, पेरणीसाठी आवश्यक बियाणे व खतांची उपलब्धता, पाणी व्यवस्थापन, हवामान बदलाचा संभाव्य परिणाम अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी आमदार माउली कटके यांनी शासनाच्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवण्याच्या सूचनाही अधिकारी वर्गाला देऊन , आदित शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे शासनाच्या अनेक योजना राज्य शासन व केंद्र शासन आणत आहे परंतु अधिकारी वर्ग या योजना तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यात कमी पडत आहे. यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असून हा दुरावा दूर करण्यासाठी अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या योजनेत त्यांच्या दारापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे त्यातून शेतकरी सक्षम झाला पाहिजे हा उद्देश प्रत्येक अधिकाऱ्यांनी ठेवला पाहिजे असेही आमदार कटके यांनी सांगितले. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य नियोजन कृषी खात्याने करून देणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच पंचायत समिती शिरूर व हवेली यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बियाणे सहजासहजी उपलब्ध होतील या कडे कटाक्षाने लक्ष घालावे. कांदाचाळीच्या अनुदानात वाढ झाली असुन 25 टन क्षमतेच्या कांदा चाळीस एका टनाला पुर्वी 3500 रुपये अनुदान दिले जात होते आता 5000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती आमदार कटके यांनी दिली.
यावेळी शिरूर कृषी अधिकारी सुवर्णा आदक(कटके) यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पीक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेंद्रिय शेतीबाबत माहिती दिली तर खरीप हंगामात बाजरी व कडधान्य पीक चांगले यावे यासाठी पिक उगवण क्षमता चाचणी करावी असा सल्ला देऊन, महात्मा गांधी हमी रोजगार योजने अंतर्गत आंबा व केळी या पिकांची निर्यातक्षम लागवड करून येणारे उत्पन्न निर्यात करून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी आमदार कटके यांचे हस्ते प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेचे आंबळे येथील सिमा बेंद्रे व शिक्रापूर येथील नंदाताई भुजबळ या लाभार्थींना सन्मानित करण्यात आले.
बैठकीच्या शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे यांनी पिकांना हमी भाव मिळावा अशी मागणी शासनाकडे केली. गणेगावचे सरपंच तुकाराम निंबाळकर यांनी कांदा चाळीस अनुदान वाढीबाबत व लाभ मिळणेकामी सुचना मांडल्या आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले तर आभार कृषी अधिकारी डॉ गजानन नारकर यांनी मानले