मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी व फरार आरोपीला त्वरित अटक करून याच्या मागील मोठा सूत्रधारालाही अटक करावी
या मागणीसाठी शिरूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने आरोपींच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करून प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शिरूर तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता.
यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करून जो आरोपी फरार आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आकाच्या अकाला अटक झालीच पाहिजे... एक मराठा लाख मराठा ... छत्रपती संभाजी महाराज की जय..अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे, ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात, माजी सरपंच संभाजी कर्डिले,वर्षा काळे, आप्पासाहेब वर्पे, संजय बारवकर, अर्चना डफळ, आशा ढवण, मुकेश पाचर्णे,राहुल शिंदे, राहुल शिंदे, शशिकला काळे,रामभाऊ इंगळे ,रमेश दसगुडे ,महेश ढेरे, भाऊसाहेब बोराडे, सचिन देशमुख, पांडुरंग दुर्गे, दत्तात्रेय पाचंगे ,पांडुरंग कुरुंदळे संजय माशेरे, भरत ढाके, पंकज जाधव व मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मराठा संघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे म्हणाले अतिशय हत्या अंत्यत निर्घूणपणे व अमानुषपणे करण्यात आली असून
वेदनादायी आणि शरीराचा थरकाप् उडवणारा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून यामुळे समाज विचलित झाला आहे. अशाप्रकारे हत्या करणारे आरोपी यांना फाशीची शिक्षा करावी व
त्यांच्या आकाचा आका व जे फरार आरोपी आहे त्याला त्वरित अटक करावी अन्यथा या पुढील काळात मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.