शिरूर श्रीराम मंदिरात दिनांक 2 डिसेंबर रोजी काही समाजकंटकांनी मांसाहार करून मंदिराचे पावित्र्य भंग केले आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर व दुर्लक्ष करणाऱ्या ट्रस्टींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिरूर बजरंग सेनेच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना बजरंग सेनेच्या वतीने देण्यात आले.
शिरूर शहरात जुन्या काळातील श्रीराम मंदिर असून, या मंदिराच्या व भाविकांची भावनिकता यात जोडलेली आहे. या मंदिराची अवस्था दयनीय झाली आहे. दोन डिसेंबर रोजी काही समाजकंटकांनी या ठिकाणी येऊन मांसाहार करून पार्टी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याने सखल हिंदू समाजाच्या वतीने आज तीन डिसेंबर रोजी शहर बंद ठेवण्यात येऊन निषेध व्यक्त केला आहे. याला शहरातील सर्वच नागरिक व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु मांसाहार करणारे समाजकंटक व मंदिर प्रशासन ट्रस्ट यांच्यावर या प्रकरणी कारवाई व्हावी. तसेच या श्रीराम मंदिराची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, मंदिराला नीटशी सुरक्षा भिंतही नाही तर सर्वच गोष्टींनी हे मंदिर असुरक्षित आहे. यासाठी आपण शिरूर तालुक्याचे आमदार आहात आपण यामध्ये लक्ष घा,लून ज्या समाजकंटकांनी हा प्रकार केला आहे त्यांचा शोध घेऊन त्यांच्या कडक कारवाई करावी. तसेच मंदिर ट्रस्टी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी बजरंग सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी बजरंग सेनेचे उमेश शेळके, नितीन अवचार, सोनू परदेशी, उमेश जगदाळे, तर श्रीराम सेनेचे सुनील जाधव, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, शहर अध्यक्ष शरद कालेवार उपस्थित होते