शिरूर प्रतिनिधी
आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेले, स्वच्छ प्रतिमा असणारे तरुण तडफदार माऊलीआबा कटके हे सर्वसामान्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे नेतृत्व आहे. या नेतृत्वाला तुमच्या सर्वांची साथ मिळाल्यावर या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाहीi. पुणे जिल्हा परिषदेत काम करताना त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिलेली आहे, असे गौरवागार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काढले.
शिरूर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माऊली (आबा) कटके यांचाझंझावाती प्रचार दौरा झाला.
कोरेगाव भीमा येथे माऊली कटके यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कोरेगाव भीमा, वाडा गावठाण, सणसवाडी, देरकरवाडी, कांढापुरी, करंजावणे, भांबर्डे, राऊतवाडी-वाबळेवाडी शिक्रापूर परिसरात गावभेट दौर्यामध्ये नागरिकांशी संवाद साधला. यावेळी दरेकरवाडी येथे झालेल्या कोपरासभेत आढळराव पाटील बोलत होते.
गावागावांमध्ये जेसीबीतून फुलांची उधळण करीत, झांज-लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपाइं व मित्र पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी
राज्यात महायुतीचे सरकार येणार असून आपल्या हक्काचा आमदार विधानसभेत पाठविल्यानंतर या भागातील ज्वलंत प्रश्न सोडवण्याचे आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम माऊली (आबा) कटके करणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या साथीने माऊलीआबा कटके यांचे हात बळकट करून त्यांना शिरूर हवेलीच्या आमदार पदी निवडून देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी