सामाजिक उपक्रमांसाठी आपत्कालीन साहित्य द्या भाजपा किसान मोर्चाचे जयेश शिंदेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

9 Star News
0
सामाजिक उपक्रमांसाठी आपत्कालीन साहित्य द्या 
भाजपा किसान मोर्चाचे जयेश शिंदेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यातील भीमा नदीच्या तिरी गणेश विसर्जन वेळी हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन होत असताना बारा वर्षापासून विठ्ठलवाडी येथे अनेक तरुण निर्माल्य संकलनाचे काम करत असून येथे या सामाजिक उपक्रमासाठी आपत्कालीन साहित्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांची जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे.
                                विठ्ठलवाडी ता. शिरुर येथील भीमा नदीच्या तीरी गणेशोत्सव काळात प्रत्येक वर्षी हजारो गणेश मूर्तीचे विसर्जन होत असताना ग्रामस्थ व तरुण मंडळांच्या सहकार्याने येथे प्रत्येक वर्षी गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनाचे कार्य केले जात असताना येथे तहसीलदार, पोलीस अधीक्षक यांसह आदी अधिकारी आवर्जून भेट देत असतात, अलीकडील काळात येथील अनोख्या उपक्रमामुळे गणेश विसर्जनाची संख्या देखील वाढत असल्याने येथे काम करणाऱ्या युवकांना त्यांच्या संरक्षणार्थ लाईफ जेकेट, होडी यांसह आपत्कालीन साहित्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांची जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे.
सोबत - जयेश शिंदे फोटो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!