लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा या मागणीसाठी १८ ऑगस्ट पासून लहुजी शक्ती सेनेचे दादाभाऊ लोखंडे अमरण उपोषण सुरू
शिरूर दिनांक प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व भव्य स्मारक शिरूर शहरात व्हावे यासह विविध मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कोर कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे यांचे आज पासून अमरण उपोषण सुरू झाले आहे.
शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय जुनी इमारत येथे हे उपोषण सुरू आहे.
शिरूर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी आज उपोषण स्थळाला भेट देऊन लोखंडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष किरण जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नेटके, मातंग नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहिणीताई शेंडगे रूपाली गुडेकर, श्रीगोंद्याचे सोशल मीडिया प्रमुख प्रवीण शेंडगे, संकेत सुरवसे, सामाजिक न्याय विभागाचे अनिल गायकवाड, बजरंग सेनेचे उमेश शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे एजाज बागवान, गणेश लोखंडे, सतिश बागवे , रामभाऊ इंगळे, स्वप्निल रणदिवे, विशाल जोगदंड, यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
शिरूर शहरासारख्या सर्व धर्म समभाव व जातीय सलोखा जपणाऱ्या शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे असे व्यक्तिमत्व की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाचे योगदान दिले. महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने एक अजरामर लेखक, कवि, कथा, कांदबरीकार मिळाला. अशा थोर महापुरूषाचे यथोचित स्मारक व पुतळा शिरूर शहर सारख्या ठिकाणी नाही ही खुप मोठी खंत समस्त शिरूर शहरातील व तालुक्यातील मातंग समाजाच्या प्रत्येक बंधू भगिनी, जेष्ठ महिला युवकाला आहे.
शिरूर तालुक्यात ३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या समाजाला तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर विचार विनिमय व बैठकीसाठी तसेच जयंती उत्सवासाठी ठोस असे ठिकाण नाही. वर्षानुवर्षे समाजातील संघटनांच्यावतीने तसेच समाजाच्यावतीने अनेकवेळा निवेदने, मोर्चे, आंदोलने करण्यात आले. परंतू आजतागायत नगरपालिका शासन कर्त्यांनी त्या निवेदनाला केराची टोपली दाखविली व कुठलीही दखल घेतली नाही. किती दिवस समाजाने गप्प बसायचे ? सर्व आश्वासने हवेत विरली परंतू कोणीही आमच्या मागणीचा विचार केला नाही.
१८ ऑगस्ट २०२४ पासून शिरूर नगरपरिषद जुनी इमारत या ठिकाणी दादाभाऊ एकनाथ लोखंडे मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात योग्य त्या जागेवर आरक्षण टाकून उचित स्मारकासाठी जागा आरक्षित करून सदर ठिकाणी शिरूर नगरपालिकेच्या वतीने लोकशाहीराला व शिरूर शहराला साजेसे स्मारक व पुतळा व्हावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
मागण्या शिरूर शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतळा व स्मारक व्हावे.
शिरूर शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करून आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प राबवूण त्यांना हक्काची घरे मिळावी.
लाटेआळी येथील मातंग वस्ती येथे कमान टाकावी व समाजाचे समाज मंदीर उभारावे.
शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात मातंग समाजाच्या वस्तीत समाज मंदीर करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.