पावसाळा व सापांचे प्रजनन सुरु झाल्याने सर्पदंशात वाढशिरुर तालुक्यात एकाच दिवशी तिघांना सर्पदंश, महिलेचा मृत्यू

9 Star News
0
पावसाळा व सापांचे प्रजनन सुरु झाल्याने सर्पदंशात वाढ
शिरुर तालुक्यात एकाच दिवशी तिघांना सर्पदंश, महिलेचा मृत्यू
 शिरूर 
(  प्रतिनिधी ) सध्या पावसाळ्याचे दिवस तसेच सापांचा प्रजनन काळ सुरु असून बिळामध्ये पाणी जात असल्याने अनेक ठिकाणी साप आढळून येत असताना काही ठिकाणी सर्पदंश देखील होत आहेत, मात्र सर्वच साप विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना माहिती दिल्यास साप देखील वाचू शकतो तसेच नागरिकांचा धोका देखील टळू शकतो परंतु नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे. 
                                साप हे खरे तर शेतकऱ्यांचे मित्र असतात, मात्र साप निदर्शनास येताच नागरिकांची बोबडी वळते परंतु शेतात पिकांचे नुकसान करणारे उंदीर साप फस्त करत असल्यामुळे शेतातील पिकांचे एक प्रकारे रक्षण होत असते त्यामुळे काही शेतकरी शेतात साप आढळून आल्यास त्याला मारत देखील नाहीत तर समाधान व्यक्त करतात, सध्या पावसाळ्याचे दिवस व सापांचा प्रजनन काळ सुरु आहे, ग्रामीण भागामध्ये सध्या सापांचे प्रमाण वाढलेले सर्पदंशाच्या घटना देखील तितक्याच वेगाने वाढल्या नुकतेच जातेगाव बुद्रुक व इनागाव येथील एका महिलेला तर रांजणगाव गणपती येथे टेक बालकाला सर्पदंश झाला असताना एका महिलेचा मृत्यू देखील झाला, परंतु सर्व साप विषारी नसून फक्त फुरसे, घोणस, नाग, मण्यार हे साप विषारी आहेत तसेच सध्या विषारी जातीतील पोवळा हा साप आपल्या भागात आढळून येऊ लागला आहे, यांच्या व्यतिरिक्त आढळून येणारे सर्वच साप हे पूर्णपणे बिनविषारी आहेत, पावसाळयामध्ये अनेक ठिकाणी शेतातील कामे करताना तसेच घराजवळील अडगळीच्या ठिकाणी साप बसलेले असतात परंतु नागरिक पुरेशी खबरदारी न घेता सदर ठिकाणी कामे करतात त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता उद्भवते, सध्या सर्वत्र सर्पमित्र उपलब्ध असल्याने नागरिकांनी सापांबाबत गैरसमज न ठेवता आपल्या निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे येणे ही काळाची गरज बनलेली असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, संचालक दत्ता कवाद, सर्पमित्र अमोल कुसाळकर, शुभम वाघ यांनी सांगितले आहे.
 स्वतंत्र चौकट १ – 
सर्व साप हे विषारी नसतात त्यामुळे एखाद्या नागरिकाला चावलेला प्रत्येक साप विषारी असेलच असे नाही, एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्याला धीर देत जवळील रुग्णालयात घेऊन जावे, सर्पदंशावर प्रभावी औषधे उपलब्ध असल्याने वेळीच उपचार मिळाल्यास नागरिकांचा जीव वाचू शकतो.
 स्वतंत्र चौकट २ –
 विषारी सापांची थोडक्यात माहिती..........
 फुरसे – फुरसे साप घनदाट जंगलात आढळत असून त्याची लांबी दोन ते अडीच फुट वाढते तर हा साप लहान व पातळ तसेच विषारी आहे. 
घोणस – घोणस साप अत्यंत विषारी असून हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो, ग्रामीण भागातील नागरिक त्याला परड म्हणून ओळखतात तर काही नागरिक त्याला अजगर म्हणतात हा साप कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो.
 नाग – नाग फणा काढत असल्याने नाग सहजपणे ओळखून येतो, हा विषारी असून चावण्यापूर्वी फणा काढून फुस्कारतो हा देखील विषारी साप आहे. 
मण्यार – मण्यार साप भारतातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जात असून हा साप सहसा रात्रीच्या वेळी आढळून येतो, या सापाचे दात लहान असल्याने साप चावलेले देखील समजून येत नाही. 
स्वतंत्र चौकट ३ – सर्पदंश वरील प्रथमोपचार व कार्यवाही .... 
सर्पदंश झाल्यास सर्पदंशाची जागा स्वच्छ धुवावी, सदर दंशच्या काही अंतरावर रुमाल अथवा कापडाने आवळपट्टी बांधावी, मात्र अशा प्रकारची पट्टी फक्त नाग व मण्यार असल्यास बांधावी तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीला झोपू ण देता तातडीने जवळील सरकारी रुग्णालयात घेऊन जावे, जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांमध्ये सर्पदंश वरील लस उपलब्ध असतात. लस साठी इतरत्र फिरत बसू नये. 
सोबत – विषारी फुरसे, घोणस, नाग, मण्यार या चार सापांचे फोटो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!