शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने भिल्ल वस्तीतील वंचित घटकांना शालेय साहित्य व चप्पल वाटप करण्यात आले.
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था ही सामजिक भान राखत नेहमीच समाजातील दुर्बल,वंचित घटकांसाठी काम करत आहे.
आज रामलिंग येथील भिल्ल वस्ती येथे जातो तेव्हा ही बाळगोपाळ उन्हात बिना चप्पल चे खेळताना दिसायचे, त्यांना विचारले की चप्पल कुठे,तर बोलायचे चप्पल नाही मला,असे ऐकून खूप वाईट वाटायचे .म्हणूनच आज त्यांना चप्पल वाटप करण्यात आले .
तसेच जून मध्ये शाळा चालू होते,ज्यांचा कडे सर्व आहे ,त्यांची शाळेची सर्व खरेदी पण झाली.परंतु समाजात असे अनेक घटक आहेत, काहींना वडील नाही,एकटी आई काम करून मुलांना शिकवते.सर्व त्या मुलांना घेणे शक्य नाही.काहींचे मुल खूप हुशार पण घरची परिस्थिती बिकट ,अशा मुलांचे शाळेय नुकसान होऊ नये म्हणून,या मुलांना आज शालेय साहित्य वाटप करण्यात आले.ही मुलेही खूप आनंदित झाली.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या
समाजात अनेक लोक खूप श्रीमंत आहेत,आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकानी जसे जमेल तसे, फुल ना फुलाची पाकळी या गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी सहकार्य करून मुलांना शाळेचे व शिक्षणाचे महत्त्व समजाऊन सांगून,शाळेत येण्यासाठी प्रोसाहित केले.कधी काही अडचण आली तर सर्वतरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गायत्री डीगरे, वर्षा जामदार आदी महिला उपस्थित होत्या.संस्थेचा वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.